मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

पत्रास कारण कि,

प्रति, प्रवासी पुणेकर. मु.पो. दरवाज्यात. तालुका : गर्दीच्या रांगेत. जिल्हा : मिळेल त्या शीटवर प्रिया पुणेकर रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या सोबत आम्ही रोजच्या रोज न थकता आपल्या सेवेत असतो. रोजच्या गर्दीत आम्ही तुमच्याशी काही बोलावे असे नेहमी वाटत असते परंतु ते काही शक्य होत नाही. म्हणून आज पत्र लिहून आपल्याशी चार गोष्टी करत आहे. पत्रास कारण कि, नवीन सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आमची चुलत बहीण मेट्रो आता आपल्या सेवेत येत आहे. तेव्हा आमच्याकडे फारसे लक्ष दिले जाईल असे वाटत नाही. म्हणून तुम्ही पूर्णच विसरून जाण्याआधी काही आठवणी आणि अडचणी आपणास सांगण्यासाठी आम्ही सर्व जणी मिळून हे पत्र लिहीत आहोत. १९४० पासून पुणे शहराच्या सेवेत आम्ही वेगवेगळ्या नावाने कार्यरत आहोत. त्यापैकी पी एम टी नाव आपल्या सर्वांच्या ओळखीचे आणि जिव्हाळ्याचे असावे. पहाटे ५.३० पासून रात्री १२ वाजे पर्यंत आम्ही तुमच्या सेवेत धावत असतो. कोणी कामावर जात असते , कोणी शाळा कॉलेजात , कोणी पाहुण्यांकडे तर कोणी खरेदीसाठी जाण्यासाठी निघतात, तेव्हा तुम्हाला वेळेवर आणि सुखरूप पोहचवण्या साठी आम्ही सदैव तत्पर असतो.वेळेप्रमाणे आम...

पत्रास कारण कि,

प्रति, पुणेकर मैदानवाले. मु.पो.कधीतरी मैदानावर. तालुका: मैदानाच्या बेंचवर जिल्हा : मैदानाच्या कोपऱ्यावर. प्रिया पुणेकर, आजकाल आपली वाढती गर्दी पाहून आम्हा सर्व मैदानांचा उर अगदी भरून येतो.आम्हालाही मैदान म्हणून मिरवायला हुरूप येतो. तुम्ही येतच असतात तर म्हंटल चला आज तुमच्याशी दोन शब्द बोलूच. पण तुमच्या कानात आजकाल स्वतःचाच आवाज घुमवणारी बोळे लागलेली असतात त्यामुळे आमचा आवाज काही पोहचायलाच तयार नाही. म्हणून आम्ही सर्वानी एकत्र येऊन पत्र लिहायचं ठरवलं. पत्रास कारण कि, आपली शहरे दिवसेंदिवस अधिकाधिक प्रगत होत आहेत. वाहतुकीची नवी साधने वाढत आहेत. परंतु या वाढत्या सुविधांमध्ये आम्हा मैदानांचा गळा आवळला जातोय. मैदानाचे बगीचे होत चाललेत. पायामध्ये माती पेक्षा कृत्रिम गवत वाढू लागले आहे. शहरातील प्रगती ज्या वेगाने पुढे पाऊले टाकत आहे त्या वेगाने मैदाने आकुंचन पावत आहेत. तुम्ही म्हणाल कि उभ्या राहणाऱ्या प्रत्येक इमारती सोबत प्ले ग्राऊंड्स पण बांधली जातात, "अमेनिटीज " मध्ये असतात. मग तुम्ही मैदाने का ओरडतायत ? पुणेकरणांनो, मैदाने आणि अमेनिटीज मध्ये धोनी आणि विराट एवढा  फरक...

पत्रास कारण कि,

प्रति, श्री.पुणेकर ट्रॅफिकवाले. मु.पो.गाडीवर तालुका-चालू गाडीवर जिल्हा-हॉर्नपूर. प्रिय पुणेकर, नमस्कार, सादर प्रणाम !.मी लालबत्ती सिग्नलवाली. बऱ्याच दिवसांपासून तुमच्या सर्वांशी बोलायचं होत. आज मराठी राजभाषा दिनाच्या शुभ मुहूर्तावर पत्र लिहायला घेत आहे. जे येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्यापर्यंत पोहचेल अशी अपेक्षा करते आणि मुख्य विषयाकडे वळते. पत्रास कारण कि , सततचा होणार अपमान आता मला सहन होत नाही. आपल्या पुण्याचा चौका चौकात मी  दिवसभर भर उन्हात आपल्या सर्वासाठी जळत उभी असते परंतु माझ्या अस्तित्वाला नेहमी पुणेरी टोमणा मारल्या सारखे बरेचशे पुणेकर न जुमानता निघून जातात. माझी शेजारीण पिवळी बत्ती आपल्याला नेहमी माझ्या येण्याची आठवण करून देत असते आणि आपणास वेग कमी करण्यास सुचवत असते. परंतु आपण शेवटी पुणेकरच ना गाडीच्या भोंग्याचा आवाज वाढवत, मला धुडकावून लावत. आपण उलट अजूनच वेगाने निघून जाता. शेवटी माझ्या इज्जतीचे रक्षण करण्यासाठी उभे असलेले आमचे पोलीस बंधू पाहून तुम्ही कसे बसे थांबता. मी हे सर्व वरून पाहत असते. थांबल्यावर हि आपले वाहन बंद न करता भोंग्यावर हाताचे वजन वाढवून मला घाबरवत...

कृषाग्रलेख : कापूसगोष्टी (हायब्रीड युग ) ३.

हरित क्रांतीच्या आधी पर्यंत शेतकरी   पूर्वांपार चालत आलेली आपली देशी वाण किंवा देशी बियाणे वापरात होते. म्हणजेच शेतात उभ्या असणाऱ्या पिकांमधुन सुदृढ पिकातील दाणे बियाणे म्हणून शेतकरी जपून ठेवत आणि तेच पुढील पिकासाठी पेरणी करत असे. ह्यामध्ये गैर हि काही नव्हते आणि शेतकऱ्याला बियाणे विकत घेण्याची हि गरज नव्हती. आजही शेतकरी बऱ्याच पिकांमध्ये हे करतात. परंतु जसे आपल्या शरीरात एखाद्या जीवजंतूंची कमतरता किंवा अधिक मात्रा झाल्यामुळे आपली तब्बेत बिघतले तशी सजीवच असणाऱ्या वनस्पतींची (पिकांची) हि बिघडते. जोपर्यंत आपल्याकडे वेगवेगळ्या लसीकरणाचे शोध लागायचे होते किंवा त्या पोहचायच्या होत्या तोपर्यंत साथीच्या रोगांनी   रस्त्यावरील लाईटच्या खांबाखाली सकाळी लाईटवर घोंगावणारी पाखरे मरून पाडावीत अशी माणसे मरत होती.  गावेच्या गावे एकाच वेळी स्मशानात जात होती. वेगवेगळ्या लस शोधल्या गेल्या आपले शरीर प्रतिकारक बनावे म्हणून लहानपणीच त्या आपल्या शरीरात सोडल्या गेल्या. आणि जवळ जवळ आपण अश्या साथीच्या रोगांवर विजयच मिळवला. हीच वेळ वनस्पतींवर पण आली होती. सततचा दुष्काळ, विविध किडींच...

कृषाग्रलेख : कापूसगोष्टी (संकरित संक्रमण) 2.

"दोन वर्षात महाराष्ट्राला अन्न धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण नाही केल्यास मी वसंतराव फुलसिंग नाईक भर चौकात फासावर जाईन,"असा वायदा करून कायम सूट बुटात असणारा हातात पाईप असलेला देखणा मुख्यमंत्री त्याच सुटाबुटात कोणत्याही सोशल मीडिया च्या हव्यासाविना १९६० च्या दशकात शेतकऱ्याच्या शेतात जाऊन हातात खुरपी घेऊन तण काढू लागला. एकीकडे दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी पंतप्रधान एक वेळचे अन्नत्याग करून जय जवान जय किसान घोषणा देत होते तर एकीकडे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आपल्या शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन आधुनिक शेतीचा मंत्र देत होते. भारतरत्न डॉ.स्वामिनाथन यांनी हरितक्रांतीची पेटवलेली मशाल महाराष्ट्राच्या गावागावात तेवत ठेवण्याचे काम हरित क्रांतीचे प्रणेते मा.मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांनी केले. हे ऐकायला किंवा वाचायला जरी सोपे वाटत असले तरी प्रत्यक्षात ते किती क्रांतिकारक होते हे आज पिझ्झाचे तुकडे तोडताना आपल्या लक्षात सुद्धा येणार नाही. कधी घरातल्या थोरा-मोठ्यांकडून डुकरांचे खाद्य असलेल्या लाल गव्हाच्या गोष्टी ऐकल्यावर कशी माणसे हि जनावरांच्या ताटात खात होती  याचे भळभळते अंजन आपल्या ड...

कृषाग्रलेख : कापूसगोष्टी १ .

" कापूस " हा शब्द आणि पदार्थ बहुतेकांच्या जीवनात तेवढासा महत्वाचा नसेल. समईतील वात बनवण्यासाठी, कधी लागलं खुपलं तर , इंजेक्शन देताना वगैरे किंवा जखमेवर लावलेला , जुन्या उश्या गाद्यांमधून बाहेर आलेला कापूस. फार फार तर अत्तर लावून कानात कोंबून ठेवलेला आणि मयताच्या नाकात ठेवलेला कापूस . तो  कापूस  बनतो कुठे , कसा बनतो ह्यावर कधी आपण गांभीर्याने विचारच करत नाही.  कापूस  लागला तर तो घरात असतोच. एवढं काही महत्वाचा किंवा त्याच्या शिवाय घर चालू शकतच नाही अशी काही त्याची ख्याती अजून तरी नाही.तेव्हा थोडी कापसाची ओळख करून घेऊयात. इंग्रजांनी १५० वर्षे भारताला पिळून काढले त्यात सर्वात महत्वाचे कारण होते कापूस . फुटबॉल प्रेमींची ओळखीची नावे असणारे लिव्हरपूल , मँचेस्टर किंवा लँकेशायर हि शहरे ज्यावर उभी राहिली तो म्हणजे कापूस . जगात पहिली औद्योगिक क्रांती झाली त्याचा कच्चा माल म्हणजे कापूस . अमेरिकेत शेतातील मजूरकामासाठी आफ्रिकेतून काळ्यालोकांचा व्यापार चालू केला गेला त्याचे कारण कापूस . आज खनिज तेलाने जागतिक राजकारणात ज्याला हटवून आपले केंद्रस्थान बनविले आहे त...

अनेमिया चे उत्तर : परभणी शक्ती (लोहवर्धक ज्वारी ICSR14001)

अनेमिया - ५८.६% लहान मुले, ५३.२% गरोदर नसणाऱ्या महिला,५०.४% गरोदर महिला (२०१६ नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे ) या पाहणी नुसार जगातील सर्वाधिक अनेमिया (Anemia) चे रुग्ण भारतात आढळतात. त्यातही महिलांचे प्रमाण सर्वाधिक आहे. ह्या आजारपणामुळे लहानमुलांमध्ये अशक्तपणा, वयस्क लोकांमध्ये अकार्यक्षमता आणि गरोदर महिलांच्या गर्भांमध्ये बाळाची बौद्धिक वाढ न होणे असे परिणाम दिसून येतात . भारतामध्ये (इक्रिसॅट) ICRISAT इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च इन्स्टिटयूट फॉर सेमी ऐरिड ट्रॉपिक्स हि संस्था आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त प्रयत्नांतून पहिली जैविक खतांच्या साहाय्याने उत्पादित ज्वारी विकसित केली आहे. ज्यामध्ये लोह प्रमाण ५० ते ३०० टक्के पर्यंत वाढल्याचे आढळले आहे. ५ जुलै २०१९ ला ICSR14001 (परभणी शक्ती )   हे वाण सार्वजनिक करण्यात आले आहे. १०-१५% अधिक उत्पादन, आयर्न 45ppm (साधारण वाण 30ppm ) झिंक 32ppm (साधारण वाण 20ppm ), ४१ डिग्री तापमानासही सहनशील,प्रथिनांचे हि वाढीव प्रमाण आणि महत्वाचे म्हणजे बाजारातही वाढीव दर ही परभणी शक्तीची वैशिष्ट्ये. भारतामध्ये लोह(आयर्न...