मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

Maharashtra लेबलसह पोस्ट दाखवत आहे

स्वप्ने साजरी करा ....

मला असं वाटतंय .... मला, तुम्हाला आणि आपण सर्वाना खूप काही वाटत असतं . कोणाला सर्वोत्कृष्ट अभिनेता व्हायचंय,कोणाला नेता व्हायचंय , कोणाला कलाकार तर कोणाला उद्योजक व्हायचंय. हे वाटणं काही चुकीचं नाही. कारण काही तरी वाटल्याशिवाय काही तरी बनता पण येत नाही. सर्वच जण अपघाताने किंवा नशिबाने आयुष्याच्या उत्तुंग शिखरावर नक्कीच पोहचत नाहीत. काही तरी, कोणी तरी बनण्याची उर्मीच आपल्याला त्या शिखरापर्यंत घेऊन जात असते. मला वाटतं कि मी मुख्यमंत्री व्हावं , महाराष्ट्राचं भलं करावं , भ्रष्टाचार मोडून काढावा , राजकारण शुद्ध करावं , शहरांचा विकास करावा. पण हे वाटणं तुमच्या माझ्या सत्य परिस्थितीबद्दल काहीच बोलत नाही. जे बोललं जात ते भविष्याबद्दल , जे अजून घडायचं आहे. सोबतच हे वाटत असताना मी एक सामान्य नागरिक आहे, रोज महागतलं पेट्रोल डिझेल साठी रांगेत उभा असतो, निवडणुका आल्या कि रोजच्या जीवनातल्या अडचणी सोडून भलत्याच गोष्टींना बळी पडून , चार पैसे घेऊन , मान मोडलेला , स्वाभिमान मेलेला क्षुद्र मतदार आहे. ज्याला निवडणुकी नंतर काडीची किंमत नाही हे विसरून जातो. घर , गाडी चे हप्ते , टॅक्स चे हप्ते देऊन कं...

कृषाग्रलेख : कापूसगोष्टी (संकरित संक्रमण) 2.

"दोन वर्षात महाराष्ट्राला अन्न धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण नाही केल्यास मी वसंतराव फुलसिंग नाईक भर चौकात फासावर जाईन,"असा वायदा करून कायम सूट बुटात असणारा हातात पाईप असलेला देखणा मुख्यमंत्री त्याच सुटाबुटात कोणत्याही सोशल मीडिया च्या हव्यासाविना १९६० च्या दशकात शेतकऱ्याच्या शेतात जाऊन हातात खुरपी घेऊन तण काढू लागला. एकीकडे दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी पंतप्रधान एक वेळचे अन्नत्याग करून जय जवान जय किसान घोषणा देत होते तर एकीकडे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आपल्या शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन आधुनिक शेतीचा मंत्र देत होते. भारतरत्न डॉ.स्वामिनाथन यांनी हरितक्रांतीची पेटवलेली मशाल महाराष्ट्राच्या गावागावात तेवत ठेवण्याचे काम हरित क्रांतीचे प्रणेते मा.मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांनी केले. हे ऐकायला किंवा वाचायला जरी सोपे वाटत असले तरी प्रत्यक्षात ते किती क्रांतिकारक होते हे आज पिझ्झाचे तुकडे तोडताना आपल्या लक्षात सुद्धा येणार नाही. कधी घरातल्या थोरा-मोठ्यांकडून डुकरांचे खाद्य असलेल्या लाल गव्हाच्या गोष्टी ऐकल्यावर कशी माणसे हि जनावरांच्या ताटात खात होती  याचे भळभळते अंजन आपल्या ड...

कृषाग्रलेख : कापूसगोष्टी १ .

" कापूस " हा शब्द आणि पदार्थ बहुतेकांच्या जीवनात तेवढासा महत्वाचा नसेल. समईतील वात बनवण्यासाठी, कधी लागलं खुपलं तर , इंजेक्शन देताना वगैरे किंवा जखमेवर लावलेला , जुन्या उश्या गाद्यांमधून बाहेर आलेला कापूस. फार फार तर अत्तर लावून कानात कोंबून ठेवलेला आणि मयताच्या नाकात ठेवलेला कापूस . तो  कापूस  बनतो कुठे , कसा बनतो ह्यावर कधी आपण गांभीर्याने विचारच करत नाही.  कापूस  लागला तर तो घरात असतोच. एवढं काही महत्वाचा किंवा त्याच्या शिवाय घर चालू शकतच नाही अशी काही त्याची ख्याती अजून तरी नाही.तेव्हा थोडी कापसाची ओळख करून घेऊयात. इंग्रजांनी १५० वर्षे भारताला पिळून काढले त्यात सर्वात महत्वाचे कारण होते कापूस . फुटबॉल प्रेमींची ओळखीची नावे असणारे लिव्हरपूल , मँचेस्टर किंवा लँकेशायर हि शहरे ज्यावर उभी राहिली तो म्हणजे कापूस . जगात पहिली औद्योगिक क्रांती झाली त्याचा कच्चा माल म्हणजे कापूस . अमेरिकेत शेतातील मजूरकामासाठी आफ्रिकेतून काळ्यालोकांचा व्यापार चालू केला गेला त्याचे कारण कापूस . आज खनिज तेलाने जागतिक राजकारणात ज्याला हटवून आपले केंद्रस्थान बनविले आहे त...

चिलीच्या किवी आणि भारत.

जगाच्या बाजारात चिली हा देश किवी उत्पादनात पहिल्या पाच देशांमध्ये येतो. चीन,इटली,न्यू झीलंड सारख्या देशानंतर चिलीचा क्रमांक लागतो.   भारतातील किवी फळाचा वाढता खप बघून चिली हा देश भारतामध्ये किवीच्या खपासाठी खास अभियान राबवणार आहे. ज्या मध्ये किवी फळाचे आरोग्यासाठी चे फायदे सांगितले जातील आणि लोकांमध्ये त्यासंबंधीची जन जागृती होईल. हे सर्व करताना चिली या देशाचे मुख्य उद्दिष्ट हे भारतामधील किवी निर्यात दुप्पट करणे हे आहे. आपल्या आरोग्याचे फायदे समजावून घेताना चिली देशातील शेतकऱ्यांचा होणारा फायदा त्यांना मिळणारे अधिकचे दर हे पाहणे विसरून चालणार नाही. चिली सारख्या छोट्याश्या देशाने अश्या प्रकारे त्यांचा देशातील शेतकऱ्यांसाठी कल्पक अभियान राबविणे हि बाब अभिनंदनीय आहे. भारतासारख्या फळ-फळावलीच्या देशामध्ये सीताफळ, रामफळ, हनुमानफळ,करवंदे,आंबट बोर,फणस  यांसारख्या अनेक फळांनी समृद्ध देशामध्ये येणाऱ्या कोणत्याही सरकारने द्राक्षे, संत्रे,आंबा यापलीकडे जाऊन भारतीय शेतकऱ्यांसाठी कोणत्याही देशामध्ये असे काही प्रकार केलेले नोंद कदाचित नसावीच. जर अश्या प्रकारे आपल्या मूळच्या फळांना...

काय बदलले ...?

काय बदलले , काय बदलले ? रंग ना हलले रूप बदलले  खाणाऱ्यांचे मार्ग बदलले. वेळेवरती बाप बदलले जखमेवरचे मीठ बदलले. काय बदलले काय बदलले ? टोचणारे काटे बदलले चकवणारे फाटे बदलले, वाट्याचे वाटे बदलले, होणारे घाटे बदलले. काय बदलले, काय बदलले ? मर्दानगीचे नियम बदलले, देशभक्तीचे नाव बदलले खरे खोट्यात बदलले आणि खोटे नाहीच बदलले. काय बदलले काय बदलले ? लोकांचे ग्रह बदलले, ग्रहांचे तारे बदलले, शब्दांचे वापर बदलले, स्वतः शब्द पण बदलले. काय बदलले काय बदलले ? फेसबुकचे फायदे बदलले, ट्विटर चे तोटे बदलले,  व्हाट्सअपने सत्य बदलले, टीव्हीने तर आपले धंदे बदलले. काय बदलले काय बदलले ? देवांचे काम बदलले, बोलणाऱ्यांचे राम बदलले, महापुरुषांचे मान बदलले, दानपेटीमधले दान बदलले.  काय बदलले काय बदलले ? शेतीचे प्रश्न बदलले ? उत्तरांचे स्वर बदलले, शेतावरच चोर बदलले,  आणि फासावरचे दोर बदलले. काय बदलले काय बदलले ? बुद्धिबळातले प्यादे बदलले, लावायचे घोडे बदलले, पुस्तकातले धडे बदलले, आणि लोकशाहीचे खांबच बदलले. - स्वरराज.

..जे पुलवामा हल्ल्यापेक्षाही भयानक आहेत.

ऑगस्ट २०१८ मध्ये कर्नाटक मधील चिकबल्लापूर जिल्ह्यात गंगाप्पा यांना त्यांच्या शेतात मक्याच्या पिकाची पाने कुर्तडलेली दिसली. पूर्ण शेताचं नुकसान पाहताना गंगाप्पा यांच्या डोळ्यात अश्रू आणि राग एकाच वेळी होते. त्यांनी लगेच सरकार दफ्तारी झालेला प्रकार कळवला.   दक्ष अधिकाऱ्यांनीही धारवाड कृषी विद्यापीठाच्या शात्रज्ञांना त्यांच्या शेतात पाठवलं. शास्त्रज्ञांनी शेताची पाहणी केली, त्यांच्यासाठीही शेतातील ही अळी नवीनच होती. शेताची भयावह स्तिथी पाहून त्यांनी तातडीने त्याचे जनुकीय निदान करण्यासाठी अळीचे नमुने भारतीय कृषी अनुसंधान केंद्र दिल्ली आणि National Bureau of Agricultural Insect Resources (NBAIR)  यांच्याकडे  पाठवले. या दोन्ही संस्थांनी त्याचे DNA  तपासले. ८ ते १० दिवसात या संस्थानी त्याचे रिपोर्ट दिले. परंतु याच ८-१० दिवसात आसपासच्या ४ जिल्ह्यांमध्ये ह्या अळी ने मक्याचे ७०% नुकसान केले होते. एवढ्या झपाट्याने वाढणाऱ्या ह्या नवीन अळी चे नाव आहे फॉल आर्मीवोर्म (FALL ARMYWORM ) म्हणजे लष्करी अळी. आपल्याकडे अनेक प्रकारच्या लष्करी अळ्या आढळतात परंतू ही अळी...

सुपर हिट चित्रपट

सध्या चालू एक चित्रपट आहे. ज्या मध्ये मोठमोठे अभिनेते आहेत. काही तल्मितले तर काही मॅटवरचे आहेत, काही नवीन तर काही जबरदस्तीचे पन आहेत आणि काही, हे का आहेत ? असे  हि आहेत. ह्या मध्ये खूप ड्रामे आहेत. अगदी वास्को द गामापर्यंतच्या कहाण्या आहेत, इतके टर्न आणि ट्विस्ट आहेत कि गामा पासून रामापर्यंतचे पुरावे आहेत. ह्या यामध्ये मनोमिलन, घरवापसी,फुटला, बोलला, गेला आणि हाणला सारखे इमोशन्स आहेत. कर्जमाफी, शेतकरी, स्थानिक उद्योगधंदे,छोटे उद्योजक, डिजिटल जनता अशी मेड इन इंडिया ट्रॅजेडी आहे. अक्शन सध्या सुरु आहे, त्यातून बाहेर पडलात कि हसवायला १ महिना सभांची कॉमेडी आहे. सेन्सॉरच तर बंधनच नाही. नुकत्याच जन्मलेल्या बाळा पासून ते नुकत्याच गेलेल्या जीव पर्यंत सर्वांना अनिवार्यच आहे. तोफांची नावं बदलतील, मैदाने तिच राहतील .कितीही देव बदलतील पण भोग तेच राहतील अशी गोष्ट आहे. नायक कोण अन खलनायक कोण हे त्यांनीच ठरवायचं आहे, कारण स्क्रिप्ट मध्ये नाक खुपसण्यास सक्त मनाई आहे. गाणे नसतील तरी घोषणा मन रमवून ठेवतील , स्वातंत्र्य दिन नसला तरी देशभक्तीचे गीत चालू असतील. प्रोड्युसर पडद्याम...